धरणातून पाणी सोडण्याची माहिती पालिकेला तीन दिवस आधी मिळणार   

नव्या सॉफ्टवेयर प्रणालीमुळे नुकसान टळणार

पुणे : पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर धरणांमधील पाण्याची पातळी वाढल्यावर अचानक नदीमध्ये पाणी सोडल्यामुळे नदी किनार्‍यावरील घरांमध्ये पाणी घुसणे व अन्य समस्या उद्भवत होत्या. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला योग्य माहिती न मिळाल्याने नागरिकांना सूचना देणे शक्य न झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र, आता पाटबंधारे विभागातर्फे वापरल्या जाणार्‍या आरटीडीएएस (रियल टाइम डाटा एक्युजेशन सिस्टम) प्रणालीमुळे पालिकेला धरणातून पाणी विसर्गाची माहिती तीन दिवस आधी मिळणार आहे.
 
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठक मंगळवारी झाली. यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड़ पोलीस, पिंपरी-चिंचवड़ पालिका  पुणे जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी तसेच पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे व आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या.
 
पाटबंधारे विभागातर्फे धरणांमध्ये आरटीडीएएस प्रणालीचा उपयोग केला जात आहे. या प्रणालीमुळे धरणांची योग्य माहिती मिळण्यास मदत होत आहे. धरण परिसरात होणारा पाऊस, धरणामध्ये जमा होणारे पाणी, धरणातील पाणी साठ्यात होणारी वाढ, धरणातून कधी आणि किती पाण्याचा विसर्ग करावा लागेल, या संबंधी सर्व माहिती उपलब्ध होत असल्याने तीन दिवस अधी मनपाला तीन दिवस आधी पूर्वसूचना मिळू शकते.

मान्सून करिता महापालिका तयारी

विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या मान्सूनपूर्व तयारी बैठकीत मनपा प्रशासनाला माहिती विचारण्यात आली. प्रशासनाकडून माहिती दिल्यानंतर सांगण्यात आले की, मनपाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्यात यावा. नियंत्रण कक्षाकरिता कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात यावा. विभाग स्तरावर योग्य नियोजन केले जावे. यावेळी एसओपी आणि उपाययोजनांची विस्तृत माहिती देण्यात आली.

Related Articles